
महामार्गावर वाहतूक कोंडी; 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी मध्ये पर्यटक आणि चाकरमानी अडकले असून 1 किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागत आहेत. संगमेश्वर शास्त्री पूल ते सोनवी पूल दरम्यान वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी शास्त्री पूल आणि सोनी फुल यादरम्याने वाहतूक पोलीस नेमावा तसेच वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
कोकणात चाकरमान्यांचे आगमन आता जोरात सुरू झाले आहे. एसटी, खासगी बसेस आणि चारचाकी वाहनांनी चाकरमानी कोकणात दाखल होत असून, मुंबई गोवा महामार्ग अक्षरश: फुल्ल झाला आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संगमेश्वर सोनवी पूल आणि शास्त्री पूल येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या तब्बल दोन किमी लांबीच्या रांगा लागत असल्याने भक्तगण आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत . संगमेश्वर जवळच्या शास्त्रीपूल पासून संगमेश्वर बसस्थानक हे दोन किमीचे अंतर गाठायला जास्त वेळ लागत आहे . सोनवी पूलावरुन दुहेरी वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहतूकीची येथे मोठी कोंडी होत आहे .
वाढलेल्या खड्यांमुळे प्रवासाचा त्रास आणि प्रवासाचे तास वाढले आहेत. पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात येत आहेत तर परतीच्या प्रवासातही गर्दी आहे. मे महिन्याची सुट्टीमुळे कोकणात प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. लाखोंच्या संख्येने मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून चाकरमानी आपल्या गावी येत आहेत.आता जादा एसटी बसेस, तसेच खासगी बसेस आणि खासगी गाड्यांमधून चाकरमानी गावात येण्यास सुरुवात झाल्याने, मुंबई – गोवा महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा दिसून येत आहेत. चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण होऊन रस्ते खुले झाले असले, तरी सुरू असलेले काम त्यासाठी बायपास केलेले रस्ते आणि जुन्या रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे, यामुळे मात्र वाहतुकीला काही ठिकाणी प्रचंड अडचण निर्माण होऊन खोळंबा होत आहे.
प्रवासाला दोन ते तीन तास अधिक लागत आहेत. मुंबईतून संगमेश्वरला येण्यासाठी सध्या 9 तासांचा कालावधी लागत असल्याचे बस चालकांनी बोलताना सांगितले. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या तसेच पुलांची कामे करणाऱ्या ठेकेदार कंपनीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात करावा नाहीतर काम बंद करण्यात येईल असा इशारा संतप्त झालेल्या स्थानिकांनी दिला आहे.