
गोळप येथे दोघांचा दगडांनी ठेचून खून
रत्नागिरी:- गोळप परशुराम नगर येथील आंब्याच्या बागेत मध्यरात्री दोघा गुरख्यांना अज्ञातांनी दगडांनी ठेचून मारण्याचा प्रकार घडला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
परशुराम नगर येथे आंब्याची बाग रफिक मुकादम या आंबा बागायतदाराने करारावर घेतली आहे. या बागेत आंब्याच्या रखवालीसाठी दोन गुरख्यांना ठेवण्यात आले होते. त्यांना दगडांनी हल्ला करून ठार मारण्यात आल्याची फिर्याद पोलिसांत दाखल झाली आहे. पोलिस तत्काल घटनास्थळी पोहोचले असून डॉग पथकही दाखल झाला आहे. गुरख्यांना मारण्याचे कारण काय असावे? असा प्रश्न उपस्थित होत असून हा प्रकार आंबा चोरी करणार्यांकडून झाला की आणखी कोणत्या कारणाने याचा शोध पोलिस घेत असून परिसरातील आंबा बागेत रखवाली करणार्या गुरख्यांचीही चौकशी केली जाणार आहे.