
आठवडा बाजारातील भंगार गोडाऊनला लागली आग
रत्नागिरी : शहरतील आठवडा बाजारा परिसरात असणार्या भंगार गोडाऊनला सायंकाळी आग लागली या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून गेल्याने भंगार व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. या आगीच्या ज्वाळा वरपर्यंत पोहचल्या होत्या. याची माहिती रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी बंब दाखल झाला आणि त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. वर्दळीच्या रस्त्यालगत असलेले ही भंगार गोडाऊने भविष्यात मोठी दुर्घटनेची कारण ठरु शकतात. नागरी वस्तीसह जवळच बसस्थानक आहे. परिसरात इतर खाजगी वाहनेही उभी करुन ठेवली जातात अशा ठिकाणी असलेली गोडाऊन शहरासाठी धोकादायक असताना प्रशासनाने त्यांना इथे गोडाऊनची परवांनगीच कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
