
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वाटद खंडाळा येथे जयगड व रत्नागिरी पोलिसांमार्फत संचलन
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे DYSP श्री. निलेश माईनकर, त्रिपुराचे DYSP श्री सरकार, सागरी पोलीस ठाणे जयगड चे API श्री. कुलदीप पाटील, गणपतीपुळ्याच्या श्रीमती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा बाजारपेठमध्ये भव्य संचलन करण्यात आले. वरवडे फाटा ते सेंटर बँक ऑफ इंडिया खंडाळा शाखेपर्यंत संचलन करण्यात आले. या( रूट मार्क ) संचलनामध्ये रत्नागिरी पोलीस, सागरी पोलीस ठाणे जयगड, गणपतीपुळे पोलीस, खंडाळा पोलीस स्टेशन, त्रिपुरा स्टेट चे रायफल जवान यांचा समावेश होता. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. यासाठी संचलन करण्यात आले. तसेच रत्नागिरी पोलिसांकडून नागरिकांना आव्हान करण्यात आले की 7 मे 2014 ला लोकसभेचे मतदान करावे, आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, प्रचार सभेला कायदेशीर परवानगी घ्यावी असे आव्हान रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.
