
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक
भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा नमिताताई कीर यांच्या हस्ते सत्कार
रत्नागिरी:- शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात भारत शिक्षण मंडळ संचलित कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी जिल्ह्यात खाजगी शाळांच्या गटात प्रथम आली आहे. तसेच रत्नागिरी तालुक्यातही पहिली आली आहे. या शाळेच्या यशाबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, उपाध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजू ,प्रबंधक विनायक हातखंबकर ,शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर केळकर, चंद्रकांत घवाळी, श्रीकृष्ण दळी, धनेश रायकर, राजेंद्र कदम यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांचे व शाळेला मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थी ,पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच मामा मावशी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले व सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या कार्याध्यक्षा नमिताताई कीर यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे व सर्वांचे सातत्यपूर्ण कार्य आणि नियोजनाचे कौतुक केले.तसेच बालसंस्कार या विद्यार्थ्यांना अनुभवास मिळाल्याबद्दल विशेष कौतुक केलं. ध्येयवादी माणसं यश कसं खेचून आणतात व यशाने हरखून न जाता सातत्यपूर्ण कार्य कसे करतात याबद्दल अनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्टपणे श्री. विनायकजी हातखंबकर सर यांनी केले. स्वागत गीता सावंत बाईंनी केले. कृतज्ञता भारती खेडेकर यांनी व्यक्त केली.
या उपक्रमासाठी तंत्रज्ञानविषयक तांत्रिक बाजू संगणक कक्षातील संगणक शिक्षिका मंजिरी गुणे, मनस्वी तांदळे, प्रेरणा नागवेकर, अक्षता बिर्जे ,स्नेहा दांडेकर यांनी समर्थपणे सांभाळली. या उपक्रमात 30 वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले.
प्रामुख्याने स्वच्छता मॉनिटर म्हणून व्हिडिओ करण्याची जबाबदारी भारती खेडेकर , गीता सावंत श्री. दुकले सर, अक्षता बिर्जे , अदिती वालकर यांनी उत्तम सांभाळली. शाळेच्या पाठीमागील जागेत परसबाग निर्मिती करण्यासाठी श्री.सुधीर शिंदे व राठोड सर , ज्योत्स्ना सागवेकर , प्राजक्ता कदम बाई यांनी मेहनत घेऊन पालेभाजी मुळाभाजी नवलकोल व इतर भाज्यांची लागवड केली. तसेच नैसर्गिक औषध वनस्पतीची बाग यासाठी वेदिका हातखंबकर ,सुरभि सावंत , ईशा रायंगणकर यांनी विशेष मेहनत घेतली. शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेसाठी प्रीती देवरुखकर, वैदेही भिंगारे यांनी मेहनत घेतली. आरोग्य तपासणी व मुलींसाठी विशेष मार्गदर्शन घडवून आणण्यासाठी तिर्था कोकजे , पेठेबाई , डॉ.स्वाती पाटील यांनी विशेष काम केले .तसेच राष्ट्रीय एकात्मता निर्मितीसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे नियोजन व सराव सागवेकर बाई, वालकर बाई ,गीता सावंत यांनी केले .घोषवाक्यं व सेल्फी निर्मिती मार्गदर्शन व अपलोड यासाठी मार्गदर्शन व प्रत्यक्ष कार्यवाही यासाठी सौ घाणेकर, सौ दांडेकर सौ.वालकर यांनी मेहनत घेतली .शाळेत स्काऊट गाईडचे कब बुलबुल पथक निर्मितीसाठी श्री. शिंदे सर व सौ .रजनीगंधा वाघमारे यांनी विशेष योगदान दिले. तसेच शालेय परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शिवगण मामा, कुबल मामा पेजे मावशी ,चव्हाण मावशी आणि मोहिते ताई यांची विशेष मदत झाली. विद्यालयातील चिमुकल्या हातानी लाखो रुपयांचे काम जसे शालेय सुशोभीकरण ,स्वच्छता इ. पालकांच्या विशेष सहकार्याने केले.श्री. पंगेरकर सर ,श्री.लवंदे सर यांचेही सुशोभीकरणासाठी सहकार्य लाभले. शालेय इमारतीचे रंगकाम करण्यासाठी पालक बंधू सुरेश तोडणकर यांचे सहकार्य लाभले.
कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांच्या नियोजनपूर्वक कामकाजामुळे , भारत शिक्षण मंडळ संस्थेच्या सर्व सक्रीय पदाधिकाऱ्यांमुळे, शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी ,स्नेही, हितचिंतक, माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे , विशेष प्रयत्नांमुळे या अभियानात यशस्वी वाटचाल करता आली.