
कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समितीचे उपोषण तूर्तास स्थगित.
भाजप पदाधिकाऱ्यांची शिष्ठाई
रत्नागिरी :कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समिती गेले अनेक वर्षे रेल्वे प्रसासनावर आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहे,परंतु रेल्वे प्रशासनाने कधी हा विषय गांभीर्याने पाहिला नाही .अखेर सुमारे शंभर पेक्षा जास्त प्रकल्प ग्रस्तानी रेल्वे स्टेशन च्या आवारात आमरण उपोषणाला बसले.
या वेळी दुपार नंतर भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी व जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी उपोषण ठिकाणी भेट दिली, या वेळी रेल्वेचे रिजनल मॅनेजर कांबळे हे देखील त्या ठिकाणी आले..
तर भाजप नेते बाळासाहेब माने , जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांना दूरध्वनी वरून संपर्क केला. त्यांनी देखील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राव साहेब दानवे यांच्याशी संपर्क करून या मध्ये मार्ग काढण्याची विनंती करतो असे सांगितले.
शेवटी रिजनल मॅनेजर कांबळे यांनी उपोषण कर्त्यांना सांगितले ,की आपल्या मागण्या रास्त आहेत. मला आपल्या प्रती सहानुभूती आहे, मी या विषयात बेलापूरच्या वरिष्ठ कार्यलयाशी संपर्क करून आपणा सोबत येत्या ८ दिवसात बैठक लावतो., व आत्ता उपोषन मागे घ्या अशी विनन्ती केली.
त्यावर प्रकल्पग्रस्थानी पुढील होणाऱ्या बैठकीच्या आश्वासनावर आजचे उपोषण मागे घेतले.
यावेळी तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी उपोषण कर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडल्याची घोषणा केली.