
हमाल पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण
रत्नागिरी:- माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या शिकलेल्या मुलांना घेतलेच पाहिजे, माथाडी कायदा व सुरक्षा रक्षक कायदा मोडीत काढणारे सुधारणा विधेयक क्रमांक 34 मागे घेतलेच पाहिजे यासह अनेक मागण्यांसाठी रत्नागिरीतील हमाल पंचायतीचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोल मागे न घेणार असल्याचे या पदाधिकार्यांनी सांगितले.
हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष लालासाब मुजावर, सदस्य आप्पासाहेब गावडे, सदस्य पांडुरंग कांबळे, दिलीप कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले आहे. राज्यभर हे उपोषण सुरु असून शासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आ हे. पणन संचालकांनी महिनाभरापूर्वी परिपत्रक काढून वाराई प्रक्रिया संपवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. याबाबत माथाडी कामगारंमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी होत आहे. समित्या गठीत केली जात नसल्याने नाराजी पसरली आहे. माथाडी कामगार कर्मचार्यांअभावी कारभार ठप्प असल्याने नोकरभरतीत माथाड्यांच्या प्रशिक्षित मुलामुलींना प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासह अनेक मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे.
सोमवारी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे यांनी भेट देऊन हमाल पंचायतीच्या सदस्यांची चर्चा केली व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु राज्य हमाल मापाडी महामंडळाचे ÷अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या आदेशानंतरच आंदोलन पुढे चालू ठेवायचे की स्थगित करायचे याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.