
बदलत्या वातावरणाचा नारळ उत्पादनाला फटका; उत्पादनात ३५ टक्क्यांनी घट
रत्नागिरी :लांबलेला पाऊस, जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पांढर्या माशींसह विविध किडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे यावर्षी जिल्ह्यातील नारळ उत्पादनात 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे आंबा, काजू, सुपारी पाठोपाठ सुरक्षित मानले जात असलेले नारळ पिक देखील बदलत्या वातावरणाचा बळी ठरत असल्यामुळे नारळ उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नारळ उत्पादन जिल्ह्याच्या सर्वच भागात घेतले जात असले तरी राजापूर, लाजा, दापोली आाणिि गुहागर हे तालुके नारळ लागवडीसाठी अग्रणी आहेत. विशेषतः किनारी तालुक्यात नारळासाठी पोषक वातावरणआहे. या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड आहे. येथील पोषक वातावरण आणि किडरोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नारळ पिकांची लागवड वाढली आहे. परंतु, हेच नारळ पिक आता बदलत्या वातावरणाचा बळी ठरत असल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे.
पाण्यावरच जोपासले जाणार्या या उत्पदानाला गतवर्षी विलंबाने आलेल्या मोसमी पावसाची फटका बसला आहे. जिल्ह्यात एप्रिल-मेमध्ये नारळाच्या झाडांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातच मॉन्सून लांबला तर नारळाचे सिंचन करण्यासाठी अतिरिक्त खरच खरावा लागतो तर गतवर्षी पाऊस तीन टप्प्यात विश्रांती घेऊन झाला. याचा विपरित परिणाम नारळ पिकांवर झाला. एप्रिल ते जुलै अखेरपर्यंत नारळाला आलेल्या फुलोर्याचे उत्पादन निम्मेच आले आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. नारळाच्या झावळांचा आकारही या कालावधीत कमी झाल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय नारळावर पांढर्या माशींचा प्रादुर्भाव देखील दिसून आला. नारळ उत्पादन घटल्याचा परिणाम बाजारपेठेत दिसून येत आहे. बाजारपेठेत नारळाच्या दरात चांगली वाढ झाली आहे.