
नमन लोककलेचा लोककला प्रकारांमध्ये समावेश करा
संघटनेकडून पालकमंत्री ना. सामंत यांना साकडे
रत्नागिरी :नमन या लोककलेचा शासनाच्या लोककला प्रकारांमध्ये समावेश व्हावा आणि या सर्व लोककला आणि लोककलावंतांना राजाश्रय मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व नमन कलावंतांकडून पकर्षाने मागणी केली जात आहे. त्या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा संस्थेमार्पत पाठपुरावा सुरू आहे. नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मंडळाच्यावतीने पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे या आधीच यासंदर्भातील निवेदन दिलेले आहे. त्या पत्रासंदर्भात पुन्हा एकदा सामंत यांना स्मरणपत्र देण्यात आले.
रत्नागिरी सावरकर नाट्यगृह येथे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत या लोककलेला राजाश्रय मिळावा यासाठी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मंडळाचेवतीने यापूर्वी भेट घेत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली होती. नमन व जाखडी लोककलेचा लोककला प्रकारात समावेश व्हावा. सांस्कृतिक परिपत्रकात त्यांचा समावेश व्हावा आणि कलेला राजाश्रय मिळावा, यासाठी फेब्रुवारी 2023 मध्येच पत्र दिले होते. त्यावर मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून योग्य सहकार्य सुद्धा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
नमन लोककला ही कोकणातील पारंपरिक लोककला प्रकारातील एक कला आहे. त्याचप्रमाणे जाखडी अर्थात शक्ती-तुरा ही सुद्धा मोठ्या प्रमाणात सादरीकरण केली जाणारी कला आहे. या लोककलेचा शासनाच्या लोककला प्रकारांमध्ये समावेश व्हावा. या सर्व लोककला आणि लोककलावंतांना राजाश्रय मिळावा यासाठी कलावंतांची सातत्याने धडपड सुरू आहे. लोककला मंडळ रत्नागिरी जिल्हा संस्थेमार्पत या मागणीसाठी पाठपुरावा सुरू आहे. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे या आधीच यासंदर्भातील मागणी केलेली आहे.
रत्नागिरी सावरकर नाट्यगृह येथे पालकमंत्री उदय सामंत यांची नुकतीच नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मंडळाचे वतीने भेट घेण्यात आली. त्यावेळी या लोककलेला राजाश्रय मिळावा यासाठी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि सहकाऱयांनी मिळून पुन्हा एक स्मरणपत्र दिले आहे. हे स्मरणपत्र देताना अध्यक्ष प्रभाकर कांबळे, सचिव परशुराम मासये, उपाध्यक्ष मोहन घडशी, उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते, खजिनदार गजानन तटकरे, विश्वनाथ गावडे, विलास भातडे, संजय भागडे, संतोष बळकटे, श्रीधर खापरे, शिवाजी मासये, चंद्रकांत पालकर, रवींद्र कोटकर, भिकाजी भुवड, राजाराम भोवड, सचिन काष्टे, विलास कातकर, सुनील गांगरकर, अनंत वेळवणकर, देवजी हरमले, अनंत पालकर, श्रीकांत बोंबले, सुरेश येजरे आदी उपस्थित होते.
राजाश्रयाचा लवकरच पश्न सोडवणार-पालकमंत्री उदय सामंत
नमन व जाखडी लोककलेला राजाश्रय मिळवून देण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असे आश्वासन यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच नमन व जाखडी लोककलेचा प्रकार शासनाकडील सांस्कृतिक प्रकारात समाविष्ट होईल. या लोककला आणि कलावंतांना राजाश्रय मिळेल, अशी शक्यता येथील नमन लोककलावंतांकडून व्यक्त करण्यात आली आहे.