
धारावी झोपडपट्टी, वाडवण बंदर विकास स्थानिकांना विश्वासात घेऊनच: ना. सामंत
रत्नागिरी :मुंबईचा विकास व्हावा, ही आताच्या शिंदे-फडणवीस सरकारची इच्छा आहे. पण पूर्वीच्या शासनकर्त्यांना आपण काही करू शकलो नाही हे नैराश्य काही लोकांना आले आहे. म्हणून धारावी झोपडपट्टी पुर्नविकास आणि वाडवण बंदर विकासावरून आरोप सुरू झालेले आहेत. या कामांचा अदानींना ठेका मिळाला म्हणून पुरत्या सरकारला बदनाम करणे ही आता फॅशन झालीय. पण ही कामे तेथील लोकांना विश्वासात घेउनच केली जाणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुर्नविकास पकल्प कामाचा ठेका तसेच देशातील सर्वात मोठे बंदर विकसित होत असलेल्या वाडवण बंदरावरून विरोधकांनी मुद्दा उचलून धरला आहे. पण त्या विरोधावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले, की, मुंबईत झोपडपट्टी पुर्नविकास पकल्प व मेट्रोची रखडलेल्या कामांचे कारण एकमेव काँग्रेसच्या काळातील सरकार असल्याचे म्हटले. त्या काँग्रेस सरकारने केवळ मोठमोठी आमिषे जनतेला दाखवायची आणि सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात पतिकूल परिस्थितीत बघायचे नाही अशी भूमिका घेतली होती. त्यासाठी शिवसेनापमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुर्नवसन पकल्प योजना हाती घेतली होती. जेणेकरून झोपडपट्टीवासिय चांगल्या घरात जावेत, असा तत्कालीन युती सरकारने घेतला होता.
मात्र काँग्रेसच्या हे पकल्प खितपत ठेवण्याच्या वृत्तीमुळे रखडले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुर्नविकासाचा निर्णय घेतला होता. काही काळाने त्यावेळचे सरकार बदलले. त्यानंतरच्या सरकारने ठोस निर्णय घेतला नाही. आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने ही झोपडपट्टी पुर्नवसन चांगल्या पध्दतीने होत आहे. त्यावर आता ओरड सुरू आहे, अदानी हे कामाचे ठेकेदार आहेत, त्यांना ठेका मिळाला म्हणून पुरत्या सरकारला बदनाम करणे ही आता पŸढशन झालीय. पण सरकारच्या माध्यामातून पारदर्शकता वापरून ही कामे हाती घेण्यात आली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. माडवण हे देशातील सर्वात मोठे बंदर विकसित होत आहे. त्यासाठी शेतकऱयांना विश्वासात घेउनच काम केले जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.