
शेतात काम करताना दोन महिलांना सर्पदंश
रत्नागिरी :शेतात व आंबाबागेत काम करताना सर्पदंश झालेल्या दोन महिलांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैशाली यशवंत घडशी (वय ४४, रा. कोलदे, ता. लांजा) व मीनाक्षी तुळाजी निंबरे (वय २७, रा. कळझोंडी, रत्नागिरी) असे सर्पदंश झालेल्या महिलांची नावे आहेत. या घटना बुधवारी (ता. २५) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली यांना सकाळी शेतात काम करत असताना सर्पदंश झाला, तर मीनाक्षी निंबरे याना तालुक्यातील वरवडे येथे आंबा बागेत मजुरीचे काम करत असताना सर्पदंश झाला. तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.