
तालुक्यातील अवैध चीरेखाण व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करा
रत्नागिरी मनसेची प्रशासनाकडे मागणी
रत्नागिरी :तालुक्यातील अवैध चीरेखाण व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी
रत्नागिरी मनसेने प्रशासनाकडे केली आहे. या मागणीचे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार राजाराम मात्रे यांना सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे,की रत्नागिरी तालुक्यातील अनेक ठिकाणी विशेषतः देवूड, मासेबाव, चवे, नरबे, करबुडे, भोके, चाफे इ. ठिकाणी शासकीय नियम धाब्यावर बसवून चिराखाण व्यवसाय सुरू आहेत. काही ठिकाणी विना परवाना हा व्यवसाय करण्यात येत आहे. काही चिराखाणींच्या ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव तसेच शौचालयाची व्यवस्थादेखील नाही. तसेच रहदारीच्या मुख्य रस्त्यापासून २०० मीटर कक्षेत देखील चिराखाणी चालू करण्यात आल्या आहेत..
या खाणी खोदण्याचे भूगर्भीय मर्यादेचे देखील उल्लंघन होत असून अशा खोलवर खाणींमध्ये पाळीव जनावरे तसेच मनुष्यहानी सुद्धा झालेली आहे .या सर्व गोष्टींवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी.
यावेळी तहसिलदार यांना निवेदन देताना मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, सौरभ पाटील, विभाग अध्यक्ष अखिल शाहू, जयेश फणसेकर, . सोम पिलणकर, नवनाथ साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.