
आयुष्यमान भव योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे….सुहेल मुकादम
रत्नागिरी : शासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत आयुष्यमान भव ही योजना जाहीर करण्यात आली असून गांधी जयंती निमित्ताने नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र राजिवडा रत्नागिरी येथे जनजागृती मोहीम करण्यात आली.यावेळी मा.नगरसेवक सुहेल मुकादम यांनी उपस्थित नागरिकांना या बाबतीत आरोग्याची काळजी घेवून या नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राचा लाभ घ्यावा आणि ही योजना सर्वांना सांगून ती लवकरात लवकर काढून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी शकील गवाणकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन या मोहिमेचा उद्देश सांगितला.
यावेळी केंद्राचे डॉ सर्वेश चव्हाण यांनी या योजनेची माहिती सांगितली आणि आम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमी तत्पर राहू असे सांगितले , यावेळी उपस्थित नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.या कार्यक्रमाला आश्रय संघटना, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे पदाधिकारी, सभासद तसेच ,राजिवडा, शिवखोल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
