
रत्नागिरी शहरात प्रीपेड रिक्षा वाहतूक प्रायोगिक तत्वावर सुरू करणार
रत्नागिरी:- गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांकडून अनावश्यक जादा भाडे आकारले जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने रिक्षा संघटना ची बैठक घेतली मीटर प्रमाणे भाडे आकारण्याची सूचना करण्यात आली आहे. या बैठकीला आरटीओ विभागाचे अधिकारी ही उपस्थित होते.
यावेळी रेल्वे स्टेशन येथे प्रीपेड रिक्षा वाहतूक सेवा प्रायोगिक तत्त्वावर गणेशोत्सवापुरते सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच रेल्वे स्टेशन येथे लाखों चाकरमानी दाखल होणार असल्याने शहर बसेसच्या फेर्यादेखील वाढवण्याच्या सूचना प्रशासनाने एसटी विभागाला केले आहे.