
जिल्ह्यात सव्वासहा लाख जणांनी काढले हेल्थ कार्ड
रत्नागिरी :आयुष्यमान भारत डिजीटल मिशनचा (आभा) एक भाग म्हणून केंंद्र सरकारने डिजीटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 26 हजार 442 जणांनी हे कार्ड काढून घेतले आहे. अजूनही जवळपास साडेनऊ लाख कार्ड काढणे अपेक्षित असून ते काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात 1 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत आयुष्यमान भव ही आरोग्यविषयक मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये अबालवृद्धांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. ही मोहीम चार उपक्रमांद्वारे जिल्ह्यात राबविण्यात येईल. आयुष्यमान आपल्या दारी 3.0, आयुष्यमान सभा, आयुष्यमान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी असे टप्पे असणार आहेत. आयुष्यमान आपल्या दारी 3.0 या उपक्रमात जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्यमान कार्डाचे वितरण केले जाईल. आयुष्यमान सभा उपक्रमात आरोग्यविषयक सेवा-सुविधांची जनजागृतीसाठी ग्रामपंचायत व ग्रामआरोग्य पोषण समिती मार्फत आयुष्यमान कार्ड व आभा कार्डबाबत जनजागृती, आरोग्यवर्धिनी केंद्रामाफत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोगाबाबत जनजागृती केली जाईल. आयुष्यमान मेळावाअंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी किंवा रविवारी असांसर्गिक आजार (मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर-तोंड, गर्भाशय मुख, स्तन) याबाबत तपासणी, क्षयरोग, कुष्ठरोग, इतर संसर्गजन्य आजार, माता व बाल आरोग्य, संतुलीत आहार व लसीकरण, नेत्रचिकित्सा यांबाबत चार आठवड्यामध्ये तपासणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून आठवड्याला किमान एक आरोग्य मेळावा घेण्यात येणार आहे. अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध