
भविष्यातील निवडणुकांची दहीहंडी फोडण्यासाठी तयार रहा: पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी :राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी -रायगडचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी आज बाबुशेठ पाटील मित्र मंडळच्या दहीहंडी उत्सवला उपस्थिती लावत वाटदवासीयांची मने जिंकली. भविष्यातील पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, आमदारकी, खासदारकीच्या निवडणुकीची दहीहंडी फोडण्यासाठी तयार रहा असे आवाहन पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी यावेळी केले.
खंडाळाच्या कार्यक्रमाला उपस्थित गोविंदा पथक आणि नागरिकांना संबोधित करताना पालकमंत्री ना.उदय सामंत म्हणाले दरवर्षी आपण ही दहीहंडी फोडतो. कोरोना काळात ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मनमोकळ्या पणे आनंद लुटल्याण्यासाठी दहीहंडी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपण कोरोनातही दहीहंडी सारखा सन साजरा केला.

या खेळाकडे मनोरंजनाचा खेळ म्हणून याकडे गोविंदा पथकांनी बगु नका तर नोकरीं मध्येही या खेळाडूचा सहभाग होणार भविष्यात सरकार करणार असल्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत म्हणाले.
भविष्यातील पंचायत समित्या,जिल्हा परिषदा,आमदार की,खासदारकीच्या निवडणुकीची दहीहंडी फोडण्यासाठी तयारी करण्याचे आहवान पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी उपस्थितांना केले.वाटद जिल्हा परिषद गटातील दहीहंडी ची प्रथा कायम स्वरूपी सूरू ठेवण्याचे आहवान पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी यावेळी बाबू पाटील मित्र मंडळाला केली.
यावेळेस कार्यक्रमाला तालुका प्रमुख बाबू म्हाप, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुशेठ पाटील, उद्योजक नंदूशेठ केदारी, विभाग प्रमुख बाब्या कल्याणकर, अजीम चिकटे, सचिन सावंत, नामदेव चौगुले, युवासेना विभाग प्रमुख प्रशांत बापू घोसाळे, विभाग संघटक अनिकेत सुर्वे, फरजाना डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.