
रत्नागिरी तालुका भंडारी समाज महिला मंडळ यांच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
रत्नागिरी :रक्षाबंधन कार्यक्रमाची वाहतुक पोलीस निरीक्षक कार्यालयापासुन सुरुवात करण्यात आली
दिवस रात्र कायम आपल्या सेवेत असलेले पोलीस बंधू-भगिनींना राख्या बांधुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . त्यानंतर बाल सुधारगृहातील मुलांना राख्या बांधुन खाऊचे वाटप करण्यात आले . तेथील लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद विलक्षण होता . त्यानंतर दिलीप रेडकर संचालीत आशादीप गतिमंद मुलांच्या संस्थेला भेट दिली गेल्या गेल्या तेथील विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवुन महिला मंडळाचे स्वागत केले त्या सर्वांच्या सोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करुन त्यांना नारळीभात व खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी संस्थाध्यक्ष दिलीप रेडकर सर आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते .
या कार्यक्रमाला मंडळाचे
.सौ. ज्योती दिपक तोडणकर, गणेशगुळे,सौ. आदिती अमित शिरधनकर, मांडवी, श्रीमती संजया नितीन कीर, मि-या ,सौ. उर्मिला उमेश तळेकर, किल्ला,सौ. राखी अभय भोळे, काळबादेवी, सौ. स्वाती मयेकर, शिरगाव ,सौ. नेहाली नागवेकर, मुरूगवाडा, सौ. आदिती अमित भाटकर, मि-या,ॲड. सौ. प्रज्ञा दीपक तिवरेकर, भाटये,कु. रिद्धी दीपक तिवरेकर, भाटये,कु. सिध्दी दीपक तिवरेकर, भाटये, कु. नेहा विजय नागवेकर, मुरूगवाडा,. कु.अमृता रविंद्र मायनाक, मांडवी , श्री. राजीव यशवंत कीर , श्री. कांचन विश्र्वनाथ मालगुंडकर , श्री. राजेंद्र केशव विलणकर, सौ. रंजना राजेंद्र विलणकर ,श्री. नितीन जगन्नाथ तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
