
गटाद्वारे पशुपालन उद्योगासाठी 3 कोटींचे अनुदान
रत्नागिरी :पशुपालनसाठी शेतकरी गटाद्वारे पशुपालन उद्योग उभारला तर त्यासाठी 3 कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी गटांनी आणि कृषी संस्थांनी यामध्ये सहभागी होऊन योजनेला प्रतिसाद देण्याचे आवाहन कृषी विभगातर्फे करण्यात आले आहे.
पशुपालनसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. तसेच पशुपालन हे शेतीला पूरक आणि शाश्वत व्यवसाय म्हणून याकडे शेतकर्यांनी वळावे. यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. जवळपास 45 प्रकारचे उद्योग असून, यासाठी लाखोंचेअनुदान देण्यात येते. शेतकरी गटाद्वारे पशुपालन उद्योग उभारला तर त्यासाठी 3 कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक पातळीवर पशुपालन केल्यास प्रकल्प किमतीच्या 35 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. वैयक्तिक पातळीवर उद्योग उभा केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. महिला बचत गटातून, शेतकरी गटातून, विविध सहकारी संस्थांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. उत्पादित झालेल्या उत्पादनाचे मार्केटिंग आणि ब्रँडिगसाठी लागणार्या एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम शासनाकडून अनुदानात देण्यात येणार आहे.