
रत्नागिरीत 2 सप्टेंबर रोजी ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रम
रत्नागिरी: खैर ए उम्मत फांडेशन मिरकरवाडा रत्नागिरी तर्फे शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता रत्नागिरी येथील विवेक हाँटेल च्या भव्य हॉलमध्ये ऑल इंडिया मुशायरा म्हणजेच अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक आरोग्य बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही मान्यवरांचा पाहुण्यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारताच्या विविध राज्यातील ऊर्दू आणि हिंदीचे मशहूर व प्रसिद्ध खालील शायर आणि कवी आपली अदाकारी सादर करणार आहेत. त्यामध्ये शरफ नानपारवी. दिल्ली, सज्जाद झंझट. उत्तराखंड, विभा शुक्ला वाराणसी उत्तर प्रदेश, हमीद भुसावली भुसावल महाराष्ट्र, सरिता सरोज. रायपुर छत्तीसगढ, सिराज खान रत्नागिरी महाराष्ट्र, अफजाल दानिश बुरानपुर मध्य प्रदेश, कमर एजाज. औरंगाबाद महाराष्ट्र, आदर्श दुबे सागर मध्य प्रदेश, जीयाउल्ला खान अमरावती महाराष्ट्र, राना तबस्सुम मुंबई महाराष्ट्र, आबीद नजर बुरानपुर मध्य प्रदेश, तालीब सोलापुरी सोलापूर महाराष्ट्र, वारीस वारसी मेरट उत्तर प्रदेश, मुईन अचलपूरी अमरावती महाराष्ट्र, यांचा समावेश आहे.
तरी या कार्यक्रमाला आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे. भारताच्या विविध राज्यातील आलेल्या मशहूर कवी व शायरांची शायरी ऐकण्याची सुवर्णसंधी चुकवु नका असे आवाहन ऑल इंडिया मुशायरा कमेटी अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार अलिमियां काझी आणि खैर ए उम्मत फांडेशन.मिरकरवाडा रत्नागिरीचे अध्यक्ष रहीम अकबर अली यांनी केले आहे.