
भूस्खलनाचा धोका असलेल्या परिसरातील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याची युवासेनेची मागणी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये भूस्खलन आणि आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यापरिसरातील ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून त्यांचे योग्य पुनर्वसन करावे अशी मागणी रत्नागिरी तालुका युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
रत्नागिरी तालुका युवासेनेने शनिवारी जिल्हाधिकारी एम.देवेदर सिंह यांना एक निवेदन दिले.त्या निवेदनात जिल्ह्यातील भूस्खलन आणि धोकादायक ठिकाणांकडे लक्ष वेधले आहे. माळीण आणि इर्शालवाडी सारख्या दुर्घटना टाळण्यासाठी भूस्खलन होणाऱ्या ठिकाणी रहाणाऱ्या ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे तसेच त्या ग्रामस्थांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे अशी मागणी युवासेना रत्नागिरी तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी केली.