
पहिल्याच गाडीतून प्रवास करण्याची प्रा. बोडस यांची परंपरा कायम
रत्नागिरी:- कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या पहिल्या गाडीतून प्रवास करण्याची परंपरा रेल्वेप्रेमी प्रा.उदय बोडस यांनी कायम ठेवली आहे.कोकण रेल्वे मार्गावरून सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रा.उदय बोडस रत्नागिरी ते मडगाव प्रवास केला आहे.
कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून पहिल्या रेल्वेगाडीतून प्रवास करण्यासाठी प्रा.उदय बोडस अग्रेसर असतात.आज मडगाव ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन झाले.उद्या 28 जून पासून ही गाडी प्रवाशांसाठी उपल्बध होणार आहे.प्रा.उदय बोडस पत्नीसोबत हे 28 जून रोजी रत्नागिरी ते मडगाव प्रवास केला आहे.आता पर्यंत सुरू झालेल्या 22 नव्या रेल्वेगाड्यातून त्यांनी प्रवास केला आहे.