
पावसाच्या सुरुवातीलाच विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
रत्नागिरी:- महावितरण कंपनीने पावसाळी स्थितीवर मात करण्याची तयारी केल्याचा दावा केलेला असला तरी रत्नागिरी शहर आणि परिसरातील अनेक गावात तशी सज्जता दिसून येत नाही. त्यामुळेच रत्नागिरी शहर आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वीज खंडित होत आहे.
अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जुनाट आहेत. काहींचे दरवाजे उघडे आहेत. त्यामुळें पावसात विजेचा लपंडाव असाच सुरू राहणार का, असा संतप्त सवाल केला जात आहे. शहरातील जयस्तंभ कोहिनूर गार्डन जवळ ट्रान्सफॉर्मर खालचा फ्यूज बॉक्स उघडा आहे. अशी अनेक ठिकाणी स्थिती असून तातडीने याबाबत कार्यवाही आवश्यक आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव तातडीने बंद करण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.