
बिपर जॉय चक्रीवादळाचा तमाशा: चौथ्या दिवशी गणपतीपुळ्याच्या संरक्षण भिंतीवरून मोठ्या लाटेचे पाणी
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बिपरजाय चक्रीवादळाचा तमाशा सुरू असून चौथ्या दिवशीही गणपतीपुळे समुद्राच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने रविवारी महाभयंकर लाटेने गणपतीपुळे किनाऱ्यावर असलेल्या संरक्षण भिंतीच्या कठड्यावरील दुकाने पूर्णपणे नेस्तनाबूत केली.
. यावेळी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान एक अजस्त्र लाट गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीवरून गणपतीपुळे मोरया चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते रेस्ट हाऊस रस्त्यावर जोराने धडकल्याने त्यामुळे येथील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर समुद्र चौपाटीवरील संपूर्ण दुकानांचा मंडप ही नेस्तनाबूत झाल्याचे दिसून आला आहे त्यामुळे येथील व्यावसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले असले तरी नक्की किती नुकसान झाले हा आकडा कोणीच सांगू शकत नाही.रविवारचा दिवस हा या दुकानदारांसाठी चिंताग्रस्त असल्याचे दिसून आले.रविवारी अजस्त्र आलेल्या लाटेने अनेक महिला पर्यटकांच्या पर्स वाहून गेल्या तर अनेकांचे मोबाईल सुद्धा त्या पाण्याने गिळंकृत केले या लाटेच्या तडाख्याने सुमारे सुमारे दहा ते पंधरा जण जखमी झाले असून त्यांना संस्थान श्री देव गणपतीपुळे च्या रुग्णवाहिकेने तातडीने उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते .या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळवी पोलीस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण,घोरपडे तसेच रत्नागिरी येथून बंदोबस्त साठी आलेल्या महिला पोलीस कर्मचारी व गणपतीपुळे ग्रामपंचायत चे जीवरक्षक पर्यटकांना समुद्रांच्या बाहेर काढताना दिसून येत होत्या यावेळी पोलिस यंत्रणेच्या मदतीसाठी साथ ग्रामपंचायत जीवरक्षक तसेच संस्थान श्री देव गणपतीपुळे यांचे सुरक्षारक्षक व स्थानिक ग्रामस्थ मोठी मेहनत घेत आहेत चौपाटीवरील एका व्यावसायिकाला सुद्धा या लाटेचा जोरदार तडाका बसल्याचे सांगण्यात आले आहे अनेकांचे स्टॉल उध्वस्त झाले असून या अजस्त्र वाटेबरोबरच नारळ पाणी व्यवसायिकांची नारळ भेळपुरी सेंटर व अनेक व्यवसायिकांच्या सामान समुद्रामध्ये वाहून गेल्याचे दिसून येत आहे एकूणच नेमके हे वादळ कधी थांबणार याकडे सर्वांचा लक्ष लागून राहणार आहे.तसेच अजून दोन ते तीन दिवस समुद्राच्या मोठ्या लाटांचा वेग व समुद्र खवळलेला राहील,असे स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे.

