
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत जय भीम पदयात्रा
रत्नागिर:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रविवारी, १३ एप्रिल रोजी रत्नागिरी शहरात जय भीम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा सकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सुरू झाली आणि जिल्हा शासकीय रुग्णालय समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.या पदयात्रेत शहरातील विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, एन.सी.सी., एन.एस.एस., भारत स्काऊट अँड गाईड आणि माय भारत व्हॉलेंटिअरमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून निघालेली ही पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून गेली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्यावर त्यांना पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
या पदयात्रेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आणि युवकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आदर व्यक्त केला.