
आफ्रिकाच्या समुद्रात अपहरण झालेल्या दोन रत्नागिरीतील तरुणांची सुटका
रत्नागिरी :
कॅमेरून मधील डुआला येथे जाणाऱ्या ‘बिटु रिव्हर’ या बिटुमेन जहाजावर चढल्यानंतर पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून समुद्री चाच्यांनी तामिळनाडू आणि केरळ मधील व रत्नागिरीतील दोघांसहसात भारतीयांचे एक महीना अपहरण करून ठेवले होते.त्यांची सुटका काल शुक्रवारी करण्यात आली.
एमव्ही बीटू हे डांबर वाहतूक करणारे जहाज वेस्ट आफ्रिकेच्या हद्दीत गेल्यानंतर समुद्रीचाचेंच्या (पायरेट्स) ताब्यात सापडले होते.
यामध्ये समीन जावेद मिरकर (रा.भाटकरवाडा, रत्नागिरी) आणि रेहान शब्बीर सोलकर (रा. कर्ला रत्नागिरी) या दोन रत्नागिरीतील तरुणांचा अपहरण झाला होता. आणि उद्या ते आफ्रिकेतून भारतात येण्यासाठी निघणार आहेत.केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागने यांची गंभीर दखल घेतली होती.त्याचप्रमाणे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष लक्ष घातले होते.