
मालगुंड येथे शेतकऱ्यांना रक्षक सापळे वाटप
कृषी विभागाचा उपक्रम
गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी 11 मार्च रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सिंधूरत्न योजनेअंतर्गत आंबा फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळे मालगुंड परिसरातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, ग्रामपंचायत सदस्य सन्मान मयेकर संतोष चौगुले, अमित पाटील, नितीन दुर्गवळी, सदस्या शुभदा मुळ्ये, शिल्पा पवार व अन्य सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्र.मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भुवड यांनी फळमाशी नियंत्रणाच्या उपाययोजना तसेच रक्षक सापळ्याचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे, विलास राणे, दीपक दुर्गवळी, रोहित साळवी, संजय दुर्गवळी, सुबोध साळवी, राजू साळवी, भरत साळवी, सुरेश साळवी, विकास साळवी इ. शेतकरी उपस्थित होते. तसेच कृषी सहाय्यक गणेश जुवळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना विषयी माहिती दिली.