
देशातील विषमतावादी व्यवस्था समाजासाठी घातक
डॉ. भिमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन
रत्नागिरी
देशात अलिकडे कबरींचे केले जाणारे राजकारण देशाच्या ऐकतेसाठी पोषक ठरणारे नाह़ी एक समाज दुसऱ्या समाजाचा द्वेष करु लागला आहे. देशातील विषमतावादी व्यवस्था ही समाजासाठी अत्यंत घातक अशी आहे. अशा वेळी समाजात एकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. बौद्ध धम्माचा विचार सर्वांना समावून घेवून देशाला पुढे घेवून जाण्याचे कार्य करत आहे. असे प्रतिपादन ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु ड़ॉ भिमराव आंबेडकर यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने रविवारी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे खुली धम्म परिषद आयोजित करण्यात आली होत़ी. या धम्म परिषदेला डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन ड़ॉ हरिश रावलीया व रिपोर्टींग ट्रस्टी चेअरमन ॲड सुभाष जौंजाळे, संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ड़ॉ जगदीश गवई, उपाध्यक्ष एस़ के भंडारी, सरचिटणीस अशोक केदारे, भन्ते ए़ सुमेशबोधी, राष्ट्रीय सचिव वसंत पराड, जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, सरचिटणीस एऩ ब़ी कदम, भिक्खु संघ आदी उपस्थित होते.
धम्मपरिषदेला मार्गदर्शन करताना डॉ. भिमराव आंबेडकर म्हणाले की, समाजाला जागृत करण्याचे काम ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांनी अवघ्या 27 वर्षाच्या असलेल्या बाबासाहेबांबद्दल हे भविष्यातील नेतृत्व आहे अशी भविष्यवाणी केली होती. ही शाहू महाराजांची भविष्यवाणी बाबासाहेबांनी खरी करुन दाखविल़ी धम्माची दीक्षा घेतल्यांनंतर आज आपली आर्थिक, सामाजिक प्रगती झाली आह़े मात्र जे घटक बाबासाहेबांच्या विचारांनी धम्मक्रांतीमध्ये आले नाहीत त्यांची प्रगती झाली नसुन त्यांच्या वाटा चुकल्या असल्याचे दिसून येते.
बौद्ध समाजाचा एक वैभवशाली इतिहास आहे. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धम्माचा सुवर्णकाळ होता. अडीज हजार वर्षापूर्वीचा हाच सुवर्णकाळ आपणाला पुन्हा आणावयाचा आहे. धम्माचे कार्य करत असाल तर तुम्हाला भारतीय बौद्ध महासेभेसोबत यावे लागेल़ आपली उद्ष्टे साध्य करण्यासाठी आपण एकत्र येणे अत्यावश्यक आहे. आपल्यासाठी प्रवास खडतर असून वंचित समाजासाठी संघर्षमय असा काळ आहे. बिहारमध्ये महाबोधी विहारासाठी तीन दिवस धरणे आंदोलनात सहभाग घेतला. मात्र केंद्र व राज्य सरकार हा विषय गांर्भीयाने घेत नाही. आंदोलन करणाऱ्याना पाणी दिले जात नाह़ी, वीज कनेक्शन कापले जात आहे. वेळोवेळी पोलीस गडबड करतात तसेच सरकार कोणतेही निवेदन देखील करत नाह़ी अशी परिस्थिती आहे.
थिबा विहाराच्या जागेसाठी कादेशीर लढा उभारणार
सध्या बौद्धांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लेण्यांवर अतिक्रमण केले जात आहे. दीक्षा भूमीचे विदृपीकरण करण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला. रत्नागिरीतील थिबा विहाराचा विषय देखील आपल्याकडे मांडण्यात आला आहे. विहाराच्या जागेसाठी वेगळी स्ट्रस्ट निर्माण करण्यात आली आहे. मात्र या जागेचा ताबा बौद्धांना मिळावा यासाठी कायदेशीर लढा लढविला जाईल असे डॉ. भिमराव आंबेडकर यांनी सांगितले. धम्मपरिषदेत मार्गदर्शन करताना संस्थेचे रिपोर्टींग ट्रस्टी ॲड. सुभाष जौंजाळे म्हणाले की, आपण सेवा देण्याचे काम केले पाहिजे असा बुद्धांचा आपल्याला संदेश आहे. जन्माला येताना आपण काही घेवून येत नाही आणि मृत्यूनंतर काही घेवून जात नाही मग आपल्यात अहंकार कशासाठी असावा, आपल्याकडून गुन्हा घडेल अशा ठिकाणी आपण जाता कामा नये, बुद्धाचे तत्वज्ञान आपण आत्मसाद करायला हवे असे जौंजाळे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस़ क़े भंडारे यांनी सांगितले की, भिमराव आंबेडकर यांनी समाजातील गट-तट संपविण्याचे काम केले आह़े कोकण ही रत्नांची भूमि आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव तसेच रमाई यांचे माहेर असा भाग्यशाली जिल्हा आहे. सर्व समाजाला एकत्र करण्याची प्रक्रिया डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली आहे. तर ॲड जगदिश गवई यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने सर्व धर्मांना त्यांच्याप्रमाणे आचरण करण्याची संधी मिळाली आहे. आज लाखो रुपये देवून शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे खालच्या वर्गाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कायद्याचे राज्य राहिले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. बौद्ध समाजामध्ये जागृती व्हावी यासाठी आपण तयार रहायला हव असे गवई यांनी सांगितले.
तसेच धम्मपरिषदेला वसंत पराड, य़ु जी बोराडे यांनी धम्मपरिषदेत मार्गदर्शन केले. धम्मपरिषदेत रत्नागिरी जिह्यातील सर्व माजी तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार ड़ॉ भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आल़ा तसेच धम्मपरिषदेचे सुत्रसंचालन संस्थेचे जिल्हा सरचिटणीस एऩ ब़ी कदम यांनी केले. परिषदेला मोठय़ा संख्येने धम्म बांधवांची उपस्थिती होत़ी