
पानवळ ग्रामपंचायतीने लोकसहभागातून केली अनेक बंधाऱ्यांची उभारणी
रत्नागिरी: नदी, ओढ्यातील वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी रत्नागिरी पंचायत समितीने जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशानुसार मिशन बंधारे मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत पानवळ ग्रामपंचायतीने अनेक बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. श्रमदानातून उभारलेल्या बंधाऱ्यांमुळे आर्थिक बचतही झाली आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी प्रत्येक तालुक्यात मिशन बंधारे मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत जल या थीमचे काम तालुक्यात प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी पंचायत समितीने महात्मा फुले जलभूमी संधारण अभियाना अंतर्गत पानवळ ग्रामपंचायतीमध्ये मिशन बंधारे मोहीम राबवण्यात आली. यातून लोकसहभागातून अनेक बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. याबरोबरच ग्रामस्थांना सोबत घेऊन श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत कृषी विस्तार अधिकारी अक्षय शिंदे, सरपंच तनिष्का होरंबे, ग्रामसेविका नयना पंगेरकर, उपसरपंच रविंद्र मांडवकर, सदस्य राकेश घवाळी, श्वेता मांडवकर, माजी उपसरपंच सचिन तांबे, माजी सदस्य दाजी तांबे, वाडी प्रमुख रामेश्वर लिंगायत, शाम घवाळी, भिकाजी घवाळी, कृषी सहाय्यक निलेश कांबळी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.