
गणपतीपुळ्यात नारळ विक्रेत्या दाम्पत्याचे आमरण उपोषण
व्यवसाय बंद करण्यास सांगितल्याचा ग्रामपंचायतीवर आरोप
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे नाराळ विक्रेते दाम्पत्य ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषणाला बसले आहेत़. 20 वर्षापासुन सुरू असलेला नारळ विक्रीचा व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले असल्याचा आरोप या दाम्पत्याकडून करण्यात आला आह़े. आदीती शरद मयेकर व शरद मयेकर असे या दाम्पत्याचे नाव आह़े. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपण आत्मदहन करुन असा इशारा या दाम्पत्याने दिला आह़े. दरम्यान या दाम्पत्याकडून होत असलेल्या उपोषणाची दखल घेत जयगड पोलिसांनी या दाम्पत्याची भेट घेतल़ी.