
बैल आडवा आल्याने झालेल्या अपघातात जखमी चालकाचा मृत्यू
रत्नागिरी:- दुचाकीसमोर अचानकपणे बैल आडवा आल्याने झालेल्या अपघातात गंभिर जखमी झालेल्या चालकाचा उपचारांदरम्यान कोल्हपूरमध्ये मृत्यू झाला.
संजय गणपत गोताड (45,रा.ओरी सर्वेटवाडी,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच -08-एव्ही- 4337) वरुन पत्नीसह रत्नागिरी ते ओरी असता जात होता. त्यावेळी नरबे गोशाळेच्या अलीकडे त्यांच्या दुचाकीसमोर अचानकपणे एक बैल आडवा आला. त्यामुळे संजयचा दुचाकीवरील ताबा सूटल्यामुळे दुचाकी तेथील वाळू मिश्रीत खडीवरुन घसरुन हा अपघात झाला. या हे संजय आणि त्याची पत्नी श्रेया ही दोघही दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाले. त्यांना प्रथम जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी मंगळवार 17 डिसेंबर रोजी दुपारी 1.15 वा.संजय तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.