
राजापूर येथील रेल्वे प्रवासी महिलेचा मृत्यू
रत्नागिरी ः राजापूर रेल्वे स्टेशनला रेल्वेत चढलेल्या महिलेला चक्कर आली. रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथून तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. सुनिता बाबू राणे (वय ४८, रा. शेगळेवाडी- विलये, ता. राजापूर) ही घटना गुरुवारी (ता. २८) सकाळी साडेदहाच्या सुमारास राजापूर स्टेशन येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनिता राणे या सकाळी रेल्वेतून येत असताना राजापूर रेल्वस्टेशन दरम्यान त्यांना चक्कर आली. नातेवाईकांनी त्यांना रत्नागिरी रेल्वेस्टेशनला उतरवून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी (ता. २९) दुपारी पावणे एकच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.