
अ.के.देसाई हायस्कूलची विज्ञान नाटिका जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी : राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर आणि शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा 2024 गुरुवर्य अ.आ. देसाई माध्यमिक विद्यालय हातखंबा येथे उत्साहात संपन्न झाल्या. जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा विज्ञान मंडळांने विशेष परिश्रम घेतले होते या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त सात विज्ञान नाटिका सादर झाल्या. जागतिक जल संकट, ए आय आणि समाज ,आरोग्य आणि स्वच्छता, हवामान बदल आणि त्याचे परिणाम या विषयावर भाष्य करणारी विज्ञान नाट्य सादर झाली. या स्पर्धेत मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूलच्या जीवन वाचवा या विज्ञान नाटिकेला प्रथम क्रमांक मिळाला असून या संघाची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे .
जीवन वाचवा या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन प्रशालेतील अष्टपैलू शिक्षक संतोष गार्डी यांनी केले होते.पाण्याची बचत केली नाही किंवा पाण्याचे प्रदूषण थांबले नाही तर त्याचे भविष्यात कोणते परिणाम होऊ शकतात अश्या भविष्यवेधी नाटकेचे उत्तम सादरीकरण देसाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले होते. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त संघाचा सन्मान व बालकलाकारांचा सन्मान माननीय श्री नरेंद्र गावंड साहेब उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग रत्नागिरी यांच्या हस्ते करण्यात आला .याप्रसंगी
हातखंबा स्कूलचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब धोंगडे, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश कदम, कार्यवाह श्री सुभाष सुखासने उपस्थित होते. जीवन वाचवा या विज्ञान नाटिकेमध्ये कुमार भावेश गौतम खरात यांने पाच वेगवेगळ्या भूमिका साकारत उत्कृष्ट अभिनयाचे जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. जीवन वाचवा या नाटकेमध्ये कुमारी तनया सुरेश लिंगायत, कुमार भावेश गौतम खरात, कुमार चांदबी मेहबूब शेख, कुमारी रीया रमेश खेत्री, कुमारी आरोही शंकर शिंदे ,कुमारी महेक सलीम मुल्ला, कुमारी पूर्वा चंद्रकांत कांबळे, कुमारी लावण्या लखन साळुंखे यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या.नाटिका यशस्वी होण्यासाठी विज्ञान शिक्षिका सौ. वृषाली सावंत यांचे उत्तम सहकार्य लाभले. त्याचबरोबर कुमारी सानिका दिलीप वाडेकर ,कुमारी अलिशा सुनील जाधव यांनी वेशभूषा सांभाळली तर कुमार अमन सुनील जाधव ,कुमारी सुखदा शिवाजी गावकर, कुमारी.रितू रामचंद्र आखाडे, कुमार विकस सियाराम देवांगण यांनी रंगमंच व्यवस्था उत्तम बजावली होती. या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा दळी यांनी सर्वच बालकलाकारांचे कौतुक केले त्याचबरोबर प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ, माजी विद्यार्थी संघटना आणि मराठा मंदिर विद्यावर्धिनीचे सन्माननीय अध्यक्ष श्री योगेश पवार साहेब व सर्व पदाधिकारी यांनी बालचमूचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.