
महावितरणकडून वीज वसुलीसाठी जोरदार पावले
रत्नागिरी : थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी ‘महावितरण’ने जोरदार तयारी केली आहे. मुदतीत वीजबिल न भरल्यास थकबाकीदार ग्राहकांची झोप उडवणारे फोन महावितरणच्या कॉल सेंटरमधून येणार आहेत. त्यासाठी महावितरण राज्यातील १६ विभागात स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करणार असून त्यामध्ये रत्नागिरी परिमंडळाचाही समावेश आहे.राज्यात महावितरणचे जवळपास पावणेतीन कोटी वीजग्राहक आहेत. त्यांच्याकडे सुमारे ७० हजार कोटीहून अधिक वीजबिलाची रक्कम थकित असल्याचे समोर येत आहे. त्या वीज थकबाकीत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे वीज थकबाकीची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी प्रभावी कार्यवाही हाती घेतली आहे. वीज ग्राहकाने वेळीच वीजबिल भरावे, यासाठी पाठपुरावा व त्यांना प्रोत्साहित करणेही ओवश्यक आहे. त्यासाठी महावितरण आता हे कॉल सेंटर सुरू केले जाणार आहेत. या कॉल सेंटरमधून थकबाकीदार वीज ग्राहकाला कॉल केले जाणार आहे. त्या कॉल सेंटरच्या कामकाजाचा आणि वसुलीचा आढावाही त्या माध्यमातून घेतला जाणार आहे. राज्यभरातील महावितरणच्या परिमंडळात १६ ठिकाणी कॉल सेंटर असणार आहेत. धुळे महावितरण जळगाव परिमंडलात आहे, नाशिकसह अमरावती, खानदेश नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, कोल्हापूर, बारामती, पुणे, कल्याण, भांडुप, रत्नागिरी या परिमंडळाच्या ठिकाणी हे कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.नोडल अधिकाऱ्यांचे राहणार लक्षमहावितरणच्या विभागीय स्तरावरील सुरू होणाऱ्या या कॉल सेंटरवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्याकडून सेंटरमधील कॉलची संख्या, त्याची गुणवत्ता, ग्राहकांकडून प्रतिसाद, थकबाकीची वसुली, मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती, पडताळणी, ग्राहकांच्या वीजबिलाबाबतच्या तक्रारी यावर त्यांचे लक्ष असणार आहे. त्यासाठी महावितरणकडून कॉल सेंटरला थकबाकीदार ग्राहकांची यादी पुरवली जाणार आहे.