
धरणाच्या पाण्यात बुडून मनोरुग्ण तरुणीचा मृत्यू
रत्नागिरी ः घरात न सांगता निघून गेलेल्या मनोरुग्ण तरुणीचा मृतदेह कळझोंडी धरणाच्या भितींजवळ पाण्यात बुडालेल्या स्थितीत सापडला. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ऋणाली रवींद्र जोगळे (वय २८, रा. कळझोंडी, लोहारवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २३) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोरुग्ण ऋणाली ही बुधवारी (ता. २१) दुपारी बाराच्या सुमारास घरात कुणालाही न सांगता निघुन गेली होती. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंदही केली होती. तिचा शोध सुरु असताना शुक्रवारी तिचा मृतदेह कळझोडी धरण्याचा भिंतीजवळ पाण्यात बुडालेल्या स्थितीत आढळला.