
सहा वर्षात वृक्ष लागवडीसाठी ११ कोटी ८४ लाख निधी खर्ची
रत्नागिरी:- गेल्या सहा वर्षात रत्नागिरी तालुक्यातील दीडशेहून अधिक गावांमधील 2285.75 हेक्टर क्षेत्रात आंबा, काजू, नारळ, चिकू, साग आदी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यासाठी 3528 मजुरांना 11 कोटी 84 लाख 1 हजार 879 रुपयांचा शासनाचा निधी खर्ची पडला.
कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या 6 वर्षात राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी 11 कोटी 84 लाखाहून अधिक निधी खर्ची पडला आहे. या योजनेत तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी सहभाग नोंदवत शेतीपूरक रोजगार मिळवला.
शासनाच्या योजनेसाठी तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री व दिव्यांग कुटुंबप्रमुख कुटुंबे, प्रधानमंत्री आवास योजना, पारंपरिक वनवासी प्रवर्गातील ऑनलाईन जॉब वितरीत करण्यात आले.
2018-19 मध्ये 434.80 हेक्टर क्षेत्रावर 619 मजुरांनी लागवड केली. यासाठी 1 कोटी 80 लाख 46 हजार 26 रुपयांचा निधी खर्ची पडला. 2019-20 मध्ये 749 मजुरांनी 561.95 हेक्टर क्षेत्रावर 2 लाख 25 हजार 339 रुपये खर्ची पडले. 2020-21 मध्ये 381.45 हेक्टर क्षेत्रावर 629 लाभार्थी मजुरांनी लागवड केली. यासाठी 1 कोटी 72 लाख 745 रुपये खर्ची पडले. 2022-23 मध्ये 260.70 हेक्टर क्षेत्रावर 424 मजुरांनी लागवड केली. 2023-24 आर्थिक वर्षात 26 डिसेंबर अखेरपर्यंत 512 लाभार्थी मजुरांनी 290.60 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली.