
हापूस आंब्याच्या निर्यातीत लक्षणीय वाढ
एक जिल्हा एक उत्पादन योजना ; इंग्लंड, ओमान, अमेरीकेतून मागणी
रत्नागिरी, ः महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे तसेच एक जिल्हा एक उत्पादन योजनेर्गंत केलेल्या धोरणात्मक उपक्रमांमुळे हापूस आंब्याच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. वाणिज्य आणि सांख्यिकी महासंचालनालयाकडील माहीतीनूसार २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातून १५.५ हजार किलो आंब्याची निर्यात झाली असून त्यातून ३३ लाख ५६ हजार रूपये उत्पन्न मिळाले. तर २०२२-२३ साली ९५ हजार किलो आंबा निर्यातीमधून १ कोटी ४६ लाख मिळाले. २०२३-२४ साली २०.४ हजार किलो आंबा निर्यातीतून २५ लाख ९ हजार रूपये मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात हापूसची मागणी सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर महाराष्ट्रातून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्यील निर्यात ही ५३ कोटी १९ लाखांवरून २०२३-२४ साली ६२ कोटी ३५ लाखांपर्यंत वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून सयुक्त अरब अमीरात, इंग्लंड, ओमान, अमेरीका, कतार, कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन, कॅनडा व सिंगापूर या देशांमध्ये हापूस निर्यात प्रामुख्याने होत आहे. राज्य शासनाने एक जिल्हा एक उत्पादन योजनेत (ओजीओपी) प्रत्येक जिल्ह्यातील एका उत्पादनाचा उपयोग हा जागतिक बाजारपेठेत निर्यातक्षम करणे असून हापूसच्या निर्यातीच्या संधी वाढवून देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट केली. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. यंदाच्या राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन या पुरस्कारासाठी हापूस आंब्याचे नामांकन करण्यात आले आहे. रत्नागिरीत झालेल्या जिल्हा गुंतवणूक परीषदेमध्ये राज्य शासनाच्या उदयोग विभागाच्या अर्नेस्ट व यंग (ईवाय) चे वरीष्ठ सल्लागार प्रणव झुंजारराव यांनी सांगितले की, आंतराष्ट्रीय एजन्सी, नियमित प्रोत्साहन परीषद आणि उद्योग भागधारक एकत्र येवून एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) हापूस आंब्यांचे उत्पादन विकसीत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. त्यात क्षमता निर्माण कार्यशाळा, राज्य आणि जिल्हास्तरीय निर्यात परीषदा, नियमित जिल्हा प्रोत्साहन(डीईपीसी) परीषदांच्या बैठका, वेगवेगळे सामंजस्य करार यांचा समावेश आहे. रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यामुळे जागतिक स्तरावर वेगळा ठसा उमटवत आहे. विपूल नैसर्गिक संसाधने, सागरी-कृषी उत्पादने आणि प्रसिध्द हापूस आंब्यामुळे तसेच भरभराटीला आलेले रासायनिक क्षेत्र प्रगती व समृध्दीच्या मार्गावर आहे.