विश्वास, मेहनत आणि प्रगतीची ११ वर्षे! ‘घुमटकर ग्रुप’चा १२ व्या वर्षात पदार्पण महोत्सव
रत्नागिरी :सैतवडे गावाच्या मातीशी नाळ जपत देश-विदेशात विखुरलेल्या गुंबद मोहल्ल्यातील नागरिकांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘घुमटकर ग्रुप’ने आपल्या यशस्वी वाटचालीची ११ वर्षे पूर्ण करून १२व्या वर्षात दिमाखदार प्रवेश केला आहे.
दि. ५ सप्टेंबर २०१५ रोजी स्थापन झालेल्या या लोकप्रिय समूहाने आपल्या कार्यातून केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर देश-विदेशातही आपली स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली आहे.
गुंबद मोहल्ल्यातील अनेक नागरिक रोजगार, व्यवसाय व इतर कारणांमुळे देशाच्या तसेच जगाच्या विविध कानाकोपऱ्यांत वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांच्यातील आपुलकी, बंधुभाव आणि आपल्या गावाशी असलेले नाते कायम जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घुमटकर ग्रुपने केले आहे. विविध ठिकाणी विखुरलेल्या घुमटकरांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद, समन्वय आणि एकजुटीची भावना निर्माण करण्यासाठी या ग्रुपने प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
एकजूट, आपुलकी, माणुसकी आणि समाजसेवेचा आदर्श जपत ‘घुमटकर ग्रुप’ने सुरू केलेली ही वाटचाल भविष्यातही गुंबद मोहल्ल्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरावी, तसेच हा परिवार उत्तरोत्तर अधिक विस्तारत समाजोपयोगी कार्याचा नवा आदर्श निर्माण करावा, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.