
अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात
रत्नागिरी ः मुंबईतून भीक मागण्यासाठी गोव्याला निघालेली पाच अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास पडताच त्यांनी त्या सर्व मुलांना रत्नागिरी येथील चाईल्ड लाईन व महिला व बालकल्याण विभागाकडे सूपुर्द केले. त्यामुळे या मुलांना आपले पालक मिळण्यास मदत होणार आहे.
मुंबई येथून ५ अल्पवयीन मुले रेल्वेने गोव्यामध्ये जात होती. यामध्ये मानखुर्द येथील ३ तर सुरत आणि गुजरात येथील प्रत्येकी एका मुलाचा समावेश होता. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतने या सर्वांना हेरले. त्या सर्वांना रत्नागिरी येथील चाईल्ड लाईनच्या माध्यमातून संबधितांकडे सुपूर्द करण्यात आले. रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंस्था, चाईल्ड लाईन तसेच महिला व बालविकास अधिकारी हे याकामी काम करत आहेत.
अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात
रत्नागिरी ः मुंबईतून भीक मागण्यासाठी गोव्याला निघालेली पाच अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास पडताच त्यांनी त्या सर्व मुलांना रत्नागिरी येथील चाईल्ड लाईन व महिला व बालकल्याण विभागाकडे सूपुर्द केले. त्यामुळे या मुलांना आपले पालक मिळण्यास मदत होणार आहे.
मुंबई येथून ५ अल्पवयीन मुले रेल्वेने गोव्यामध्ये जात होती. यामध्ये मानखुर्द येथील ३ तर सुरत आणि गुजरात येथील प्रत्येकी एका मुलाचा समावेश होता. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतने या सर्वांना हेरले. त्या सर्वांना रत्नागिरी येथील चाईल्ड लाईनच्या माध्यमातून संबधितांकडे सुपूर्द करण्यात आले. रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंस्था, चाईल्ड लाईन तसेच महिला व बालविकास अधिकारी हे याकामी काम करत आहेत.