
स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार 10 मे रोजी रात्री 10 वा.खंडाळा ते जयगड जाणार्या रस्त्यावर घडली होती.
विकास शंकर गुरव (रा.सांडेलावगण वरचीवाडी,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री तो आपल्या ताब्यातील शाईन दुचाकी (एमएच-02-ईडी-5262) विना हेल्मेट बेदरकारपणे खंडाळा ते जयगड असा जात होता. तो रिंगीवाडी येथे आला असता त्याचा दुचाकीवरील ताबा सूटला. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजुला कातळावर गेल्याने अपघात झाला. यात विकासच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू होउन दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात विकास विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.