
रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवला; गुन्हा दाखल
रत्नागिरी: रेल्वे प्रवासादरम्यान 30 हजारांचा मोबाईल लांबवणार्या अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 29 एप्रिल रोजी रात्री 12.20 वा.सी.एस.एम.टी एक्सप्रेसमध्ये घडली आहे.
याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबई सी.एस.एम.टी एक्सप्रेसचे इंजिन बाजुकडील दुसर्या जनरल डब्यात अप्पर बर्थ व झोपून प्रवास करत होते. रात्री 12.30 वा. सुमारास त्यांची रेल्वे रत्नागिरी रल्ेवे स्टेशनवर आली असता ते झोपी गेल्याची संधी साधत अज्ञाताने त्यांच्या डोक्याखालील मोबाईल लांबवला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.