
गारवा प्रदर्शनाचे उदघाट्न, पहील्याच दिवशी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
रत्नागिरी, : रत्नागिरीच्या चोखंदळ ग्राहकांसाठी आपल्या आवडीच्या वस्तू हाताळून, पारखून मनपसंत खरेदीचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी गारवा प्रदर्शनाचे रत्नागिरी शहरातील जयेश मंगल पार्क येथे आयोजन करण्यात आले. हे प्रदर्शन दि. १२, १३ व १४ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
आज गारवा प्रदर्शनाचे उदघाटन सोहळा पार्लर असोसिएशन आणि सौ. शुभांगी जयंत देसाई व श्री. जयंत रघुनाथ देसाई या मान्यवरांच्या हस्ते पार पडला. प्रदर्शनाचे पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
हे प्रदर्शन रत्नागिरीतल्या महिलांसाठी सौ. अदिती देसाई, सौ. आरती पटवर्धन व सौ. तृप्ती लोध यांनी निव्वळ ग्राहकांच्या खरेदीच्या आनंदासाठी आयोजित केले आहे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या प्रदर्शनात नेहमीच्या प्रॉडक्ट व्यतिरिक्त काही हटके प्रॉडक्ट सुद्धा आहेत. जसे सिल्वर कॉटिंग आर्टिकल, हॅन्डमेड पर्सेस, हॅन्डमेड लाकडी खेळणी, ज्वेलरी तर आहेच. याशिवाय लहान मुलांसाठी उपयुक्त असणारे वस्तू चे स्टॉल आहेत. जिभेचे चोचले पुरवणारे, तृप्तीचा ढेकर देणारे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा आहेत.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जानेवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत खास छोटया दोस्तासाठी लिटील चॅम्पस रॅम्प वॉक आयोजित केला आहे. 04 ते 10 या वयोगटातील मुले रजिस्टर एन्ट्री सहयात भाग घेऊ शकतात असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.