
कोल्हापूर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. समीर चॉंद मुलाणी (वय ४९, रा. पोलीस त्यांगीनगर, ता.
करवीर जि. कोल्हापूर, सध्या सांडेलावगण-जयगड, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) दुपारी अडीचच्या सुमारास वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चाळीमध्ये
राहणाऱ्या मयत मुलाणी यास ठेकदार फोन करत होते. पण फोन उचलत नव्हता म्हणून खबर देणार तेथे गेले असता त्यांना ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. तात्काळ त्यांनी उपचारासाठी वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.