
दुचाकी अपघात प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या बायपास रस्त्यावर ८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वा. घडली आहे. अविनाश दशरथ आग्रे (२६, रा. गोळप, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिस हेड कॉस्टेबल प्रशांत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, ८ नोव्हेंबर रोजी अविनाश आग्रे हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन भरधाव वेगाने जाताना दुचाकीवरील ताबा सुटला. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले.