
वारकरी संप्रदाय हा भक्तांच्यामुळे जपला जात आहे: अविनाश लाड
रत्नागिरी :- महाराष्ट्रातील विशेषतः आपल्या कोकणामध्ये मोठा वारकरी संप्रदाय अस्तित्वात असून त्यामूळे ऐक धार्मिक परंपरा जपली जाते आहे. त्याकरिता आपली वारी सुखकर व्हावी ,माझा बळीराजा सुखी समृद्ध व्हावा अशी मी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो व आपल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असे प्रतिपादन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी केले.
लांजा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली असून दिंडीचे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बहुसंख्य कार्यकर्त्यांसह दाभोळे येथे स्वागत करून वारकऱ्यांना महाप्रसाद वाटप केला. यानिमित्ताने वारकरी संप्रदाय भक्तांनी समाधान व्यक्त केले व ह्रदयपूर्वक आभार मानले व पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिला व आपली मनोकामना लवकर पूर्ण व्हावी यासाठी आम्ही सर्व वारकरी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो असे वारकरी संप्रदाय भक्तांनी सांगितले.
यावेळी कॉंग्रेस रत्नागिरी जिल्हा सचिव संतोष गोताड, वसंत बाऊल, चोरवणे माजी सरपंच सुदेश चव्हाण,महम्मूदु पावसकर राजन शिंदे,विशाल बाईंग, अमोल लाड,योगेश बांडागले ,भाऊ बाईंग, नलावडे, अनेक कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.