
आम्ही शिवसैनिक, जशास तसे उत्तर देऊ: अल्ताफ संगमेश्वरी
रत्नागिरी :जयस्तंभ येथील शेअर रिक्षा स्टॉपच्या श्रेय्यवादात न पडता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करावे. जनता चांगल्या कामाची दखल घेते. परंतु शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर आम्ही पण शिवसैनिक आहोत, गप्प बसणार नाही, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे रत्नागिरी अल्पसंख्याक तालुकाप्रमुख अल्ताप संगमेश्वर यांनी मनसेला दिला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय उर्फ बारक्या हळदणकर, विनोद झाडगावकर आणि रिक्षा व्यवसायिक उपस्थित होते. शहरातील जयस्तंभ येथील शेअर रिक्षा स्टॉपवरून जोरदार श्रेय्यवद सुरू आहे. या स्टॉपचे शिवसेनेने (शिंदे गट) आणि मनसे या दोन्ही पक्षाने बॅनर लावून श्रेय्यासाठी चढाओढ सुरू आहे. यातून मनसेने शिवसेनेच्या शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांना आंगावर आला तर शिंगावर घेऊ, असे उत्तर दिले होते. त्याला आज शिवसैनिकांनी प्रत्युत्तर दिले.
श्री. संगमेश्वरी म्हणाले, जयस्तंभ येथे शेअर रिक्षा स्टॉपचे नुकतेच शिवसेनेच्या हस्ते उद्घाटन झाले. तसा बॅनर लावण्यात आला. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची भाषा केली. मला याची वस्तुस्थितीत सांगायची आहे. अनेक रिक्षा चालकांनी जयस्तभ येथे शेअर रिक्षा स्टॉपचा प्रस्ताव ठेवला होता. सर्वांत प्रथम स्वाभिमान रिक्षा संघटनेचे अशोक वाडेकर यांनी त्यासाठी प्रयत्न केला. त्यांन कोणी अर्ज केला माहित नाही. परंतु शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांच्या यांच्याकडे काही रिक्षा व्यवसायिक आले. त्यांनी शेअर रिक्षा स्टॉपबाबत मागणी केली. त्यानुसार आम्ही पत्र संबंधित विभागाला पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे आम्हाला हा थांबा मिळाला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही केला असले, मरा माहित नाही. परंतु आम्ही फक्त फोटो काढत बसलो नाही. प्रस्तावाच्या मागे लागून परवानग्या मिळविल्या.
परंतु काहीनी श्रेय्यवाद घातला आहे. तुम्ही चांगले काम करा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. लोकांना देखील महित असते, कोण काय करते ते. प्रत्येकाला वाटते आपला पक्ष मोठा झाला पाहिजे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. परंतु अंगावर घेण्याच्या भाषा केली तर आम्ही गप्प बसणार नाही. जशात तसे उत्तर देऊ. आम्ही रिक्षा व्यवसाय जवळऊन पाहिला आहे. आमची विनंती आहे, श्रेयवादात न पडता जनतेची कामात धन्यता माना. लोकांची सेवा करा. परंतु दादागिरी खपुन घेतली जाणार नाही, असा सल्लाही संगमेश्वरी यांनी दिला.
