
मनसे च्या मागणीला यश जयस्तंभ येथे शेअर रिक्षा थांबा मंजूर
रत्नागिरी :शहरातील जयस्तंभ व रेल्वे स्थानक परिसर येथे शेअर रिक्षासाठी थांबा असावा अशी मागणी काही दिवसांपूर्वी शेअर रिक्षा चालकांनी रत्नागिरी शहर मनसे पदाधिकाऱ्यांकडे केली होती यावर मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांच्याकडून निवेदनाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस प्रशासन व वाहतूक विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता या मागणी ला यश मिळत यापैकी शहरातील जयस्तंभ येथे रिक्षा थांबा उभारण्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यलयाकडून मंजूरी देणारा ठराव पारित करण्यात आला आहे. शेअर रिक्षा ने प्रवास करणाऱ्या नागरिकांची लक्षणीय संख्या व मागणी तसेच नियमित रिक्षाचालक व शेअर रिक्षाचालक यांच्यात सतत होणारे वाद, अधिकृत थांबा नसल्याने होणारी दंडात्मक कारवाई यावर तोडगा निघावा यासाठी मनसे तर्फे हे निवेदन देण्यात आले होते त्याला यश मिळाले असून यामुळे आता परवडणाऱ्या दरात प्रवासाच्या दृष्टीने नागरिकांची सोय तर होणार आहेच त्याचबरोबर शेअर रिक्षा चालकांनाही हक्काचा थांबा प्राप्त होणार आहे.रेल्वे स्थानक परिसरात ही लवकरच योग्य त्या बाबींची पूर्तता करून रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने शेअर रिक्षा थांबा मंजूर होणार असून यामुळे नागरिकांची सोय होऊन मनमानी करणाऱ्या रिक्षाचालकांनाही चाप बसेल असे मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी म्हटले आहे.