
जिल्ह्यात पुन्हा होणार स्वच्छतेचा जागर; ३० जानेवारीपर्यंत ग्रामस्वच्छता अभियान
रत्नागिरी :ग्रामीण स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. स्वच्छतेचा मंत्र ग्रामीण कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात 30 जानेवारीपर्यंत संत गाडगेबाब ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
सन 2022-23 व त्यापुढील कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याबाबत निर्धारीत केलेले आहे. त्या निकषानुसार सन 2023-24 या वर्षातील स्पर्धा घेण्याबाबत शासन स्तरावरुन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या स्वच्छतेबाबतीत होणारे मतपरिवर्तन व गावांगावामधून सुरु असलेल्या स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व नागरिक व ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यपूर्ण सहभाग घेतला जाणार आहे.
ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मूळ उद्देश ग्रामीण जनतेच्या आरोग्यमानाचा दर्जा उंचावण्याचा आहे. याचे महत्त्व पटवून देण्याकरीता सन 2000-2001 पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सन 2022-23 व त्यापुढील कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याबाबत निर्धारीत केलेल्या निकषानुसार सन 2023-24 या वर्षातील स्पर्धा घेण्याबाबत शासन स्तरावरुन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने सन 2023 – 24 या वर्षातील स्पर्धा 7 ऑक्टोबर 2022 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहीत वेळेत पार पाडाव्यात, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.
त्यानुसार ग्रामपंचायत स्तर समिती गठन व कृती कार्यक्रम निश्चिती दि.19 ऑक्टोबर ते दि.15 नोव्हेंबर, जिल्हा परिषद गटस्तर स्पर्धा व तपासणी दि.21 नोव्हेंबर ते दि.21 डिसेंबर, जिल्हा परिषद गट स्तर प्राथमिक तपासणी , दि.21 नोव्हेंबर ते दि.5 डिसेंबर, जिल्हा परिषद
गट अंतिम तपासणी दि.6
डिसेंबर ते दि.21 डिसेंबर,
जिल्हास्तर तपासणी दि.22 डिसेंबर 2023 ते दि. 6 जानेवारी 2024, विभागीयसतर तपासणी दि.7 जानेवारी ते दि.30 जानेवारी दरम्यान होणार आहे.
जिल्हास्तर जिल्हा परिषद गट प्रथम पारितोषिक 60 हजार रु., जिल्हास्तर प्रथम 6 लाख, द्वितीय 4 लाख तर तृतीय 3 लाख रु., विभागस्तर पथम 12 लाख रु., द्वितीय 9 लाख, तर तृतीय 7 लाख रु., राज्यस्तरावर प्रथम 50 लाख रु., द्वितीय 35 लाख रु, तर तृतीय 30 लाख रु. अशी आहे. त्याचपमाणे स्व.वसंतराव नाईक पुरस्कार – घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन जिल्हास्तर 50 हजार, विभागस्तर 75 हजार, राज्यस्तर 3 लक्ष रु., डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार – पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन जिल्हास्तर 50 हजार , विभाग स्तर 75 हजार, राज्य स्तर 3 लक्ष, स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार – शौचालय व्यवस्थापन जिल्हास्तर 50 हजार, विभाग स्तर 75 हजार, राज्य स्तर 3 लक्ष रु. आहे.