
रत्नागिरी रेल्वे स्थानक व जयस्तंभ परिसरात शेअर रिक्षा चालकांना थांबे उभारु द्यावेत मनसेची मागणी.
रत्नागिरी :रेल्वे स्थानक व शहरातील जयस्तंभ येथे शेअर रिक्षा थांबे उभारण्यास परवानगी मिळावी यासाठी मनसे रत्नागिरीतर्फे आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेत निवेदन देण्यात आले.काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील रिक्षा व्यावसायिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या होत्या यावेळी रत्नागिरीत शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या ही लक्षणीय असल्याने रत्नागिरी रेल्वे स्थानक व जयस्तंभ येथे शेअर रिक्षा चालकांसाठी थांबा असावा ही मागणी पुढे आली होती, शेअर रिक्षासाठी चा अधिकृत जागा नसल्याने रिक्षाचालकांना अनेकदा दंडात्मक करवाई सह नियमित रिक्षाचालकांच्या दादागिरी ला सामोरे जावे लागते सामोरे जावे लागते काही दिवसांपूर्वीच नियमित रिक्षा चालकांकडून रेल्वे स्थानक परिसरात शेअर रिक्षा चालकाला झालेल्या मारहाणी नंतर यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी आज मनसेतर्फे हे निवेदन देण्यात आले यावेळी झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात शेअर रिक्षाचालकाला झालेल्या मारहाणी संदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेत
चर्चा करण्यात आली, यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहर सचिव अजिंक्य केसरकर, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव,मनविसे शहरअध्यक्ष तेजस साळवी,अनंत शिंदे रिक्षाचालक इमरान नेवरेकर, , मोहोम्मद रिजवान, महेंद्र शिंदे, विनायक शिंदे,नितिन चेचरे,सचिन रांबाडे, वैभव बेंद्रे, प्रशांत साळुंखे, प्रणव साळुंखे, नवनाथ कुड आदी उपस्थित होते.
