
तवसाळ खाडीत पडून खलाश्याचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड येथील तवसाळ खाडी किनारी नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या प्रौढाचा तोल जाऊन पाण्यात पडून मृत्यू झाला. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधन माझी (वय 57, रा. ग्राम गरुरा पोस्ट कामदेवहीड, ता. कटोरिया, जि. बाकाबिहार) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना मगळवारी (ता. 3) पहाटे चारच्या सुमारास तवसाळ खाडीच्या पाण्यात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत बुधव माझी हा खबर देणाऱ यांच्या मालकीच्या मल्हारी मार्तंड साई कृपा या बोटीवर सोमवारी झोपला होता. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी उठून गेला असता त्याचा तोल जाऊन तवसाळ खाडीच्या पाण्यात पडून बुडून मृत झाला. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात बोट मालकाने खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.