रेल्वे प्रवासात मोबाईलची चोरी
रत्नागिरी : रेल्वे प्रवासामध्ये मोबाईल चोरल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तरुणाने दाखल केलेल्या तक्रारारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीची ही घटना ६ सप्टेंबरला रात्री १०.३० ते मध्यरात्री २.३० वा. कालावधीत घडली आहे. आकाश प्रकाश पार्टे (वय २९, रा. ठाणे) यांनी ही तक्रार दिली आहे.
त्यानुसार, आकाश मेंगलुरु एक्स्प्रेसने प्रवास करत असताना त्यांनी आपला फोन चार्जिंगला लावून ठेवला होता. प्रवासादरम्यान ते झोपी गेले असता अज्ञाताने ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.